K. J. Somaiya Medical College and Research Centre v. Maharashtra University of Health Sciences

Supreme Court of India · 19 May 2023
Abhay S. Oak; Rajesh Bindal
Civil Appeal Nos. 3180-82 of 2016; Civil Appeal Nos. 3183-85 of 2016
labor appeal_dismissed Significant

AI Summary

The Supreme Court held that medical teachers appointed before 1998 were validly appointed under then-prevailing rules and awarded monetary compensation instead of reinstatement after unlawful termination in 2004.

Full Text
Translation output
(इंग्रजीमध्ये टंकलिखित क
े लेल्या न्यायनिर्णयाचा मराठी अनुवाद)
अप्रसिद्धकरण्यायोग्य
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात
दिवाणी अपीलीय अधिकारिता
दिवाणी अपील क्रमांक. ३१८०-८२/२०१६

े . जे. सोमैया वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन क
ें द्र आणि अन्य. ...अपीलकर्ते
विरुद्ध
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि इतर. इत्यादी ... उत्तरवादी
सह
दिवाणी अपील क्रमांक. ३१८३-८५/२०१६
न्यायनिर्णय
अभय एस. ओक. न्यायमूर्ती
वास्तवीक पैलू
१. दिनांक १७ एप्रिल २००७ रोजी मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या
द्विसदस्यीय ख
ं डपीठाने अपीलकर्त्यांनी दाखल क
े लेल्या तीन वेगवेगळ्या रिट
याचिकांमध्ये पारित करण्यात आलेल्या सामायिक न्यायनिर्णयास आणि
आदेशाला, दिवाणी अपील क्र. ३१८०-८२/२०१६ अपवाद मानते. दिनांक १७
एप्रिल २००७ रोजी पारित करण्यात आलेल्या न्यायनिर्णयास आणि आदेशाचा

े रविचार करण्याची मागणी करणारी फ
े रविचार याचिका फ
े टाळणाऱ्या
आदेशाला आव्हान देण्यासाठी दिवाणी अपील क्रमांक. ३१८३-८५/२०१६ दाखल
करण्यात आली आहे. या याचिकांमध्ये डॉ. मेधा व्ही. जोशी, श्रीमती अंजली
खवनेकर आणि डॉ. (श्रीमती) स्मिता करंदीकर हे उत्तरवादी क्र.५ आहेत.
अपीलकर्ते वैद्यकीय महाविद्यालय चालवित आहेत. डॉ. मेधा व्ही. जोशी यांची
शैक्षणिक पात्रता बी. एस. सी. (सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र), एम. एस सी.
(संशोधनाने जैवरसायनशास्त्र) आणि पीएचडी (संशोधनाने उपयोजित
जीवशास्त्र) अशी आहे. अपीलकर्त्यांनी दि. ३१ जुलै १९९१ रोजी त्यांची
जैवरसायनशास्त्रात व्याख्याता म्हणून नियुक्ती क
े ली. श्रीमती अंजली खवनेकर
यांची शैक्षणिक पात्रता बी.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि एम.एस.सी.
(सूक्ष्मजीवशास्त्र) अशी आहे. अपीलकर्त्यांनी दि. ९ नोव्हेंबर १९९३ रोजी
मायक्रोबायोलॉजीमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती क
े ली. डॉ.
(श्रीमती) स्मिता करंदीकर यांच्याकडे बी. एस. सी. (प्राणीशास्त्र), एम. एस. सी.
(प्राणीशास्त्र) आणि पीएच. डी. (प्राणीशास्त्र) ची पदवी आहे. दि. ४ जुलै १९९१
रोजी त्यांची शरीरक्रियाशास्त्र विषयातील अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती
करण्यात आली. सदरच्या तिन्ही अधिव्याख्यात्यांच्या प्रकरणानुसार, त्यांची
नियुक्ती नियमितपणे पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून क
े ली जात असे. संबं धित
वेळी, सदरचे वैद्यकीय महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते.
अधिव्याख्यात्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अधिव्याख्याता पदावर नियुक्तीसाठी
मुंबई विद्यापीठाने ठरवलेली पात्रता संबं धित वेळी पूर्ण क
े ली.
२. वर्ष १९९८ पासून सदरचे वैद्यकीय महाविद्यालय उत्तरवादी क्र.१ असलेल्या
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न होते. १९९८ साली उत्तरवादि क्र.३-
भारतीय वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय संस्थांमधील शिक्षकांसाठी किमान पात्रता
नियम, १९९८ (थोडक्यात "१९९८ नियम") तयार क
े ले. नियम आणि पात्रता या
नियमांच्या अनुसूची-१ मध्ये नमूद करण्यात आल्या होत्या. अधिव्याख्यात्यांच्या
म्हणण्यानुसार, अनुसूची-१ च्या ख
ं ड २ मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे
की शरीर रचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, औषधशास्त्र आणि
सूक्ष्मजीवशास्त्र विभागांमध्ये, विभागातील एक
ू ण पदांच्या ३० टक्क
े मर्यादेपर्यंत
बिगर वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती क
े ली जाऊ शकते. अधिव्याख्यातांनी असे
प्रतिपादन क
े ले कि, सदरच्या ख
ं ड २ मध्ये असे दिले आहे कि, बिगर वैद्यकीय
शिक्षकांची अधिव्याख्याता म्हणून नियुक्तीसाठी एम. एस. सी. ची पात्रता पुरेशी
आहे. दि . २१ जून २००४ पासून या तिन्ही अधीव्याख्यात्यांच्या नोकऱ्या रद्द
करण्यात आल्या, कारण ते पात्र नसल्यामुळे त्यांची नोकरी सुरुवातीपासूनच रद्द
करण्यात आली होती.
३. उपरोक्त तिन्ही अधिव्याख्यातांनी उत्तरवादी क्र. १- विद्यापीठाच्या तक्रार
निवारण समितीकडे धाव घेतली. तक्रार निवारण समितीद्वारे दि.९ मे २००६ रोजी
एक ठराव मंजूर करत तिन्ही अधिव्याख्यातांच्या पुनर्स्थापनेची शिफारस करण्यात
आली. या ठरावात अशी तरतूद करण्यात आली होती की याचिकाकर्त्यांनी त्यांच्या
नियुक्तीला मान्यता देण्याचा प्रस्ताव उत्तरवादि क्र. १-विद्यापीठाकडे अग्रेषित
करावा आणि वर्ष १९९८ पासून उत्तरवादि क्र. १ विद्यापिठाने पूर्वलक्षी प्रभावाने, या तिन्ही अधिव्याख्यात्यांच्या नियुक्तीला मान्यता द्यावी.
४. तक्रार निवारण समितीच्या निर्णयाने /शिफारशीने व्यथित होऊन, अपीलकर्त्यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयासमोर तीन रिट याचिका दाखल

े ल्या होत्या. उच्च न्यायालयाने आक्षेपित न्यायनिर्णय आणि आदेशात उच्च
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की संबं धित तारीख ही ती तारीख आहे
ज्यावर उक्त तिन्ही अधिव्याख्यात्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उच्च
न्यायालयाने नमूद क
े ले की अपीलकर्त्यांनीही हे मान्य क
े ले की हे तिन्ही
अधिव्याख्याते त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार
योग्यरित्या पात्र होते आणि उत्तरवादी क्र ३-भारतीय वैद्यकीय परिषदेने त्यांच्या
नियुक्तीवर कधीही आक्षेप घेतला नाही जोपर्यंत सदरचे वैद्यकीय महाविद्यालय
उत्तरवादि क्र. १-विद्यापीठाशी संलग्न झाले नाही. असा निर्णय घेण्यात आला कि, १९९८ चे नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना
तक्रार निवारण समितीच्या शिफारशींचे त्वरित पालन करण्याचे निर्देश दिले. उक्त
निर्देश जारी क
े ल्यानंतर, परिच्छेद ७ मध्ये, उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे
निरीक्षण नोंदवलेः
"७. प्रतिवादी क्रमांक ३ कडे याचिकाकर्त्यांना नव्याने शिफारस करता
येईल ज्यामध्ये निदर्शनास आणून देता येईल कि, नियम लागू होण्याच्या
खूप आधी संबं धित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते १९९१-
९२, १९९२- ९३ या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात शिकवत आहेत आणि
१९९८ चे नियम त्यांना लागू होणार नाहीत. असे असूनही वैद्यकीय परिषदेने
ते मान्य क
े ले नाही कि
ं वा त्यावर विचार क
े ला नाही, तर याचिकाकर्त्यांनी योग्य
दिलासा मिळवण्यासाठी या न्यायालयात जावे.”
५. १५ जानेवारी २००८ रोजी या न्यायालयाने, या प्रकरणातील नोटीस जारी

े ली होती. त्या दिवशी अंतरिम दिलासा देण्याच्या प्रार्थनेबाबत नोटीसही जारी
करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण वेळोवेळी तहक
ू ब करण्यात आले. दि.
२८ मार्च २०१६ रोजी परवानगी देण्यात आली. अशा प्रकारे, दि. १७ एप्रिल २००७
रोजीचा उच्च न्यायालयाने पारित क
े लेला आक्षेपित न्यायनिर्णय आणि आदेश या
याचिका प्रलंबित असताना लागू होता. तथापि, तक्रार निवारण समितीच्या
निर्णयाचे त्वरित पालन करण्याचे निर्देश देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आक्षेपित
आदेशाची अपीलकर्त्यांनी अंमलबजावणी क
े ली नाही.
निवेदने
६. अपीलकर्त्यांची बाजू मांडणारे विद्वान ज्येष्ठ वकील श्री. जे. पी. कामा यांनी
सादर क
े ले की, जरी उत्तरवादी क्र. ३- भारतीय विज्ञान परिषदचे १९८९ च्या
नियमांचे अवलोकन करण्यात आले असले तरी, तिन्ही अधिव्याख्यात्यांपैकी
कोणीही पात्र नव्हते. १९९८ च्या नियमांनुसारही, त्यापैकी कोणीही पात्र नव्हते.
त्यांनी निदर्शनास आणून दिले की अधिव्याख्यात्यांची नोकरी संपुष्टात आणावी
लागली कारण उत्तरवादी क्र १-विद्यापीठ कि
ं वा उत्तरवादी क्र. ३- भारतीय
वैद्यकीय परिषदने वर्ष २००३-०४ दरम्यान त्यांना मान्यता दिली नाही. त्यांनी सादर

े ले की उत्तरवादी क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिषदेने क
े लेल्या तपासणीदरम्यान, या तिन्ही अधिव्याख्यात्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली नव्हती. त्यामुळे
त्यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच अवैध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे
पुनः स्थापनेचा प्रश्नच उद्भवत नाही. आक्षेपित आदेशाच्या अंमलबजावणीमुळे
अपीलकर्त्यांवर मोठा वित्तीय भार पडेल, जो ते पेलण्यास सक्षम नाहीत, असे
त्यांनी प्रतिपादन क
े ले.
७. या तिन्ही अधिव्याख्यात्यांचे अधिवक्ते श्री. गौरव अग्रवाल, श्री. उदय
गुप्ता आणि इतर विद्वान अधिवक्तांनी सर्वप्रथम, सांगितले की, हे स्वीकारण्यात
आले आहे कि, जेव्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा ते प्रचलित
नियमांनुसार पात्र होते. गेल्या सोळा वर्षांच्या कालावधीत या न्यायालयाने अंतरिम
दिलासा दिलेला नसला तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी
करण्यात अपीलकर्ते अपयशी ठरले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचे म्हणणे असे
आहे कि, नियुक्तीच्या वेळी हे तिन्ही अधिव्याख्याते पात्र होते आणि त्यामुळे सेवा
समाप्तीचे आदेश कायद्याने चुकीचे होते.
आमचा दृष्टीकोन
८. दि.२२ फ
े ब्रुवारी २०२३ रोजी आम्ही या तिन्ही अधिव्याख्यात्यांना या
आदेशात नमूद क
े लेल्या चार पैलूंवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले, ते
खालीलप्रमाणे :
“प्रतिवादींचे विद्वान वकील, डॉ. मेधा व्ही. जोशी, श्रीमती अंजली खवनेकर आणि
डॉ. (श्रीमती) स्मिता करंदीकर यांचे प्रतिज्ञापत्र खालील बाबींवर दाखल करतीलः -
१. त्यांनी दि. २१/०६/२००४ नंतर, क
ं त्राटी कि
ं वा इतर कोणत्याही प्रकारे
नोकरी मिळवली होती का;
२. जर ते नोकरी करत असतील तर त्यांच्या नोकरीचा तपशील;
३. क
ं त्राटी कि
ं वा अन्यथा त्यांच्या नोकरीदरम्यान त्यांना मिळालेल्या
पगाराची माहितीही, असल्यास त्यांनी द्यावी; आणि
४. ते सेवानिवृत्तीच्या वयात पोहोचले आहेत की नाही.
………..”
या न्यायालयाच्या निर्देशांनुसार, संबं धित अधिव्याख्याता नी प्रतिज्ञापत्र दाखल

े ले आहेत आणि अपीलकर्त्यांनी उक्त प्रतिज्ञापत्रांना त्यांचे उत्तर दाखल क
े ले
आहे.
९. उच्च न्यायालयाच्या आक्षेपित न्यायनिर्णय आणि आदेशाच्या परिच्छेद ६
मध्ये, हे स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे की अपीलकर्त्यांनी हे मान्य क
े ले की हे
तिन्ही अधिव्याख्याते त्यांच्या संबं धित नियुक्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या
नियमांनुसार योग्यरित्या पात्र होते आणि उत्तरवादि क्र. ३-भारतीय वैद्यकीय
परिषदेने त्यांना १९९८ साली वैद्यकीय महाविद्यालय उत्तरवादी क्र.१- विद्यापीठाशी
संलग्न होईपर्यंत अध्यापनाचे काम करण्याची परवानगी दिली. ही स्वतः
अपीलकर्त्यांनी दिलेली स्पष्ट सवलत असल्याने, त्यांच्या नियुक्त्या
सुरुवातीपासूनच रद्दबातल असल्याचा अपीलकर्त्यांचा युक्तिवाद न स्वीकारण्यात
उच्च न्यायालय योग्य होते. तक्रार निवारण समितीच्या शिफारशींची
अंमलबजावणी करण्यासाठी अपीलकर्त्यांना निर्देश देताना, हे तिन्ही
अधीव्याख्याते १९९१-९२ आणि १९९२-९३ या वर्षांपासून शिकवत आहेत आणि
त्यामुळे १९९८ चे हे नियम त्यांना लागू होणार नाहीत, असे उत्तरवादि क्र. ३-
भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निदर्शनास आणून देण्याबद्द्लल, अपीलकर्त्यांना
नव्याने निवेदन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. जर भारतीय वैद्यकीय परिषद
मान्यता देत नसेल तर, उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना उच्च न्यायालयात
जाण्याचा उपाय राखून ठेवला. त्यामुळे, उच्च न्यायालयाच्या आक्षेपित निर्णयात
आणि आदेशात आम्हाला स्वतः ला कोणतीही त्रुटी आढळत नाही.
१०. आता, प्रश्न असा आहे की, या टप्प्यावर, आनुषं गिक लाभांसह
पुनर्स्थापनेचा दिलासा दिला जाऊ शकतो का? या तिन्ही अधिव्याख्यातांनी दाखल

े लेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. डॉ. मेधा व्ही. जोशी यांनी
प्रतिज्ञापत्र असे दाखल क
े ले आहे कि, दि.३१ जुलै २०१० रोजी वयाच्या ६२ व्या
वर्षी निवृत्तीचे वय गाठले असते. तिने असा दावा क
े ला कि, दि. २१ जून २००४
नंतर, जेव्हा तिची नियुक्ती संपुष्टात आली, तेव्हा तिला कधीही नोकरी मिळाली
नाही. तिच्यानुसार, सेवा समाप्तीच्या वेळी तिचा पगार रु. १४,८८०/- प्रति महिना
एवढा होता. तिने असे प्रतिपादन क
े ले की जेव्हा तिने सेवानिवृत्तीचे वय गाठले
असते, तेव्हा तिचा पगार अंदाजे रु. १,८०,०००/- दरमहा एवढा असता.
अपीलकर्त्यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करून जवाब दिला आहे ज्यामध्ये असे
मान्य करण्यात आले आहे कि, दि. २१ जून २००४ पासून तिची सेवा समाप्त
करण्यात आली होती. त्यांच्या भूमिक
े नुसार, हे व्याख्याती दि. ३१ जुलै २०११
रोजी निवृत्त झाली असावी. या प्रतिज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये असे उघड
करण्यात आले आहे की सेवा समाप्तीच्या वेळी तिचा मासिक पगार रु. १६४७४/-
एवढा होता आणि तिच्या सेवानिवृत्तीच्या वेळी तिचा पगार रु. ४३,५६६/- एवढा
राहिला असता.
११. श्रीमती अंजली खवनेकर यांच्या संदर्भात, त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात
नमूद क
े ले आहे की, दि. २१ जून २००४ ते दि. २ जानेवारी २००५ पर्यंत त्या
नोकरीवर नव्हत्या. तिने दि. ३ जानेवारी २००५ पासून शैक्षणिक सल्लागार म्हणून
नोकरी स्वीकारली. तिच्या म्हणण्यानुसार, ती दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत नोकरीत
होती. तिने नमूद क
े ले आहे की आर्थिक वर्ष २००५-०६ मध्ये, तिचे वार्षिक वेतन
रु. १,२६,०००/- होते, जे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये रु. ८,३०,७८१/- इतकी
वाढली होती. तिच्या मते, तीने दि. ३१ जुलै २०२२ रोजी सेवानिवृत्तीचे वय गाठले
असते. प्रतिसादात, अपीलकर्त्यांनी नमूद क
े ले की सदरची अधिव्याख्याती हि

े ब्रुवारी २०२३ च्या अखेरीस निवृत्त झाली असती. अपीलकर्त्यांनी दाखल

े लेल्या प्रतिज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, तिच्या सेवा समाप्तीच्या वेळी तिचा मासिक पगार रु. १५,४७६/- होता आणि

े ब्रुवारी २०२३ पर्यंत तिचा मासिक पगार रु. १,१३,७७३/- एवढा झाला असता.
१२. श्रीमती स्मिता करंदीकर यांच्या बाबतीत, त्यांचे प्रकरण असे आहे की, त्यांनी त्यांच्या सेवा समाप्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी
कोणतीही नोकरी स्वीकारली नाही. तिच्या मते, तीने दि. ३० एप्रिल २०१९ रोजी
सेवानिवृत्तीचे वय गाठले असते. तिने प्रतिज्ञापत्रात नमूद क
े ले आहे की, ती दि. १
जानेवारी २००५ पासून मेसर्स निलमॅक पॅक
े जिंग इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कौटुंबिक
व्यवसायात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होती. सुरुवातीला, तिचा
मासिक पगार रु. ४०,०००/- एवढा होता. असे नमूद क
े ले आहे की, आर्थिक वर्ष
२०१९-२० मध्ये तिचा वार्षिक पगार रु. २५,००,०००/- एवढा होता. प्रतिसादात, अपीलकर्त्यांनी सांगितले की ती दि. ३० एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाली असती.
अपीलकर्त्यांनी दाखल क
े लेल्या प्रतिज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये असे नमूद
करण्यात आले आहे कि, तिच्या सेवा समाप्तीच्या वेळी तिचा मासिक पगार रु.
१६,१४२/- होता आणि निवृत्तीवेतनाच्या वयात तिचा मासिक पगार रु.
१,०१,०००/- एवढा झाला असता.
१३. आपण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की उत्तरवादी क्र. ३-भारतीय वैद्यकीय
परिषदेची भूमिका नेहमीच अशी आहे की ह्या तिन्ही अधिव्याख्यात्या वैद्यकीय
महाविद्यालयात शिकवण्यास पात्र नव्हत्या. निघून गेलेली वेळ आणि उत्तरवादी
क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिषदेची भूमिका लक्षात घेता, आमचे असे मत आहे की
या टप्प्यावर पुनर्स्थापना देणे योग्य ठरणार नाही. शिवाय, दि. २१ जून २००४ नंतर
ते आजपर्यंत या तिन्ही अधिव्याख्यातांपैकी कोणीही शिक्षक म्हणून काम क
े लेले
नाही.
१४. आक्षेपित न्यायनिर्णय हा अपीलकर्त्यांनी दिलेल्या त्या सवलतीवर
आधारित आहे की नियुक्तीच्या तारखेला, उक्त तिन्ही अधिव्याख्यात्या पात्र
होत्या. अपीलकर्त्यांनी आक्षेपित न्यायनिर्णयाचे पालन क
े ले नाही. त्यामुळे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अंतर्गत आमच्या अधिकारक्षेत्राचा वापर
करून त्यांच्या पुनर्स्थापनेच्या बदल्यात अधिव्याख्यातांना वाजवी नुकसान भरपाई
द्यावी लागेल, असे आमचे मत आहे.
१५. डॉ. मेधा व्ही. जोशी हिच्या प्रकरणाकडे परत जाताना, शपथेवर तिची
भूमिका अशी आहे कि, दि. २१ जून २००४ नंतर तिने कधीही नोकरी
स्वीकारली नाही. तीने असा दावा क
े ला की पात्रतेच्या अभावामुळे सेवा समाप्त

े ल्याने, तिला इतर कोणतीही नोकरी मिळण्याच्या संधीवर परिणाम झाला. तिने
असे म्हटले नाही कि, मागील सुमारे १९ वर्षांत तिने नोकरी मिळवण्यासाठी
कोणतेही प्रयत्न क
े ले नाहीत. अपीलकर्त्यांनी दाखल क
े लेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दि.
३१ जुलै २०११ रोजी तीने सेवानिवृत्तीचे वय गाठले असते. जर तिच्या सेवा
समाप्तीच्या वेळी तिला दिला जाणारा पगार आणि तिच्या निवृत्तीवेतनाच्या
तारखेला देय असलेल्या पगाराची सरासरी घेतली गेली तर ती दरमहा अंदाजे रु.
३०,०००/- पर्यंत येईल. डॉ. मेधा व्ही. जोशी ह्यांना नोकरीवरून काढून
टाकल्यानंतर नोकरी मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांना तीन वर्षांच्या सरासरी
पगाराच्या बरोबरीची भरपाई देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. तिचे सरासरी वार्षिक
वेतन रु. ३,६०,०००/- एवढी आहे आणि म्हणून, तीन वर्षांसाठी सरासरी वेतन
रु.१०,८०,०००/- असेल, जो आकडा रु. ११,००,०००/- पर्यंत पूर्ण क
े ला जाऊ
शकतो. याव्यतिरिक्त, ती याचिक
े च्या खर्चाच्या हक्कदार असेल, ज्याची राशी रु.
५०,०००/- एवढी असेल.
१६. श्रीमती अंजली खवनेकर यांच्या बाबतीत, त्यांच्या प्रकरणानुसार, त्या दि.
२ जानेवारी २००५ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कार्यरत होत्या. असे दिसते की तिने
स्वतः हून नोकरी सोडली. दि. ३० सप्टेंबर २०२१ नंतर तिने कोणतीही नोकरी
स्वीकारली नाही. तिच्या भूमिक
े नुसार, तिने दि. ३१ जुलै २०३३ रोजी निवृत्तीचे वय
गाठले असते. पुनर्स्थापना मंजूर झाली असती तर तिला आणखी दहा वर्षे काम
करण्याचा अधिकार होता. अपीलकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, फ
े ब्रुवारी २०२३ च्या
अखेरीस ती सेवानिवृत्तीच्या वयात पोहोचली असती. तिच्या सेवा समाप्तीच्या
तारखेला आणि फ
े ब्रुवारी २०२३ पर्यंत तिला देय असलेला सरासरी पगार दरमहा
रु. ६०,०००/- आहे. आम्ही एक वर्षाच्या सरासरी पगाराच्या समतुल्य भरपाई
म्हणून देण्याचा प्रस्ताव मांडतो जी रु. ७,२०,०००/- पर्यंत येईल. याव्यतिरिक्त, ती याचिक
े च्या खर्चाच्या हक्कदार असेल, ज्याची राशी रु. ५०,०००/- एवढी
असेल.
१७. आता, डॉ. (श्रीमती) स्मिता करंदीकर यांच्या प्रकरणाकडे येत असताना, त्यांनी दि. ३ जानेवारी २००५ रोजी नोकरी स्वीकारली आणि दि. ३० सप्टेंबर २०२१
पर्यंत त्या काम करीत राहिल्या. अपीलकर्त्यांनी दाखल क
े लेल्या प्रतिज्ञापत्राच्या
जोडपत्र-अ नुसार, सेवा समाप्तीच्या तारखेला आणि सेवानिवृत्तीच्या तारखेला
तिला देय असलेला सरासरी पगार दरमहा अंदाजे रु. ५८,५००/- असेल. आम्ही
तिला एका वर्षाच्या सरासरी पगाराच्या समतुल्य भरपाई देण्याचा प्रस्ताव मांडतो
ज्याची राशी रु. ७,०२,०००/- येते, ज्यास रु. ७,१०,०००/- पर्यंत पूर्ण क
े ली जाऊ
शकते. याव्यतिरिक्त, ती याचिक
े च्या खर्चाच्या हक्कदार असेल, ज्याची राशी रु.
५०,०००/- एवढी असेल.
१८. आक्षेपित निर्णय आणि आदेशात आम्हाला दोष आढळत नसला तरी, जोपर्यंत या तिन्ही अधिव्याख्यात्यांच्या पुनर्स्थापनेचा प्रश्न आहे, तोपर्यंत आम्ही
अपीलकर्त्यांना या तिन्ही अधिव्याख्यात्यांच्या पुनर्स्थापनेच्या बदल्यात खालील
नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे निर्देश देऊन दिलासा देतोः
अ. क्र. अधिव्याख्यात्याचे नाव नुकसानभरपाईची रक्कम
१. डॉ. मेधा व्ही. जोशी रु. ११,००,०००/-
२. श्रीमती अंजली खवनेकर रु. ७,२०,०००/-
३. डॉ. (श्रीमती) स्मिता करंदीकर रु. ७,१०,०००/-
१९. याव्यतिरिक्त, त्या प्रत्येकी याचिक
े च्या खर्चाच्या हक्कदार असेल, ज्याची
राशी रु. ५०,०००/- एवढी असेल. नुकसानभरपाईची रक्कम आणि खर्चाची रक्कम
आजपासून दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना दिली जाईल. आजपासून दोन
महिन्यांच्या आत उपरोक्त तिन्ही अधिव्याख्यातांना उपरोक्त रक्कम अदा न

े ल्यास, या निर्णयाच्या तारखेपासून रक्कम भरण्यापर्यंत वार्षिक ९ टक्क
े दराने
व्याज मिळेल.
२०. आम्ही या तीन अधिव्याख्यातांना त्यांच्या संबं धित बँ क खात्यांच्या रद्द

े लेल्या धनादेशांच्या प्रतींसह त्यांच्या खात्याचा तपशील आजपासून एका
आठवड्याच्या कालावधीत अपीलकर्त्यांकरिता असलेल्या ऍडव्होक
े ट-ऑन-
रेकॉर्डला देण्याचे निर्देश देतो. अपीलकर्त्यांनी आजपासून दोन महिन्यांच्या
कालावधीत संबं धित खात्यांमध्ये उपरोक्त रक्कम जमा करावी.
२१. वरील अटींवर अपील निकाली काढण्यात येते. ....................... न्या.
(अभय एस. ओक) .................न्या .
(राजेश बिंदल)
नवी दिल्ली;
१९ मे २०२३.
अस्वीकरण
"या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा
पक्षकारास त्याच्या/ तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून
घेण्यापुरताच मर्यादित राहील आणि त्याचा इतर कोणत्याही
कारणाकरिता वापर करता येणार नाही. तसेच, इंग्रजी भाषेतील
न्यायनिर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता
विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि
अंमलबजावणी वैध मानला जाईल.”
JUDGMENT